Skip to main content

THE FATHER OF INDIAN CINEMA

माफ़ करा दादासाहेब....! 

खूप काही असताना जे "टोचतं" ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, फाळकेंना कसं विसरून जमेल हो ....! 

त्यांच्या आयुष्यातील हे ही दिवस होते यावर विश्वास बसत नाही ... 
(image - dadasaheb falke "the father of indian cinema" )

1939 च्या मे महिन्यात भारतीय चित्रपटसृष्टीचा रौप्य महोत्सव मुंबईत साजरा झाला, 
या आधीच 'फिल्मइंडिया' चे संपादक बाबुराव पटेल यांनी आपल्या लेखात लिहले होते की रौप्य महोत्सव साजरा करत असताना आपण "फाळके" यांना विसरता कामा नये, त्यांनी आपल्या देशाला मनोरंजनाचे एक नवे माध्यम आणि संस्कृती चे एक नवे साधन बहाल केले आहे, अशा शब्दांत त्यांनी फाळके यांचा गौरव करत व फाळके यांच्या हलाखीच्या परिस्थिती कडे लक्ष वेधत ते म्हणाले की "मोठ्या थाटामाटात रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी हजारो पैसे खर्च करण्यात येईल, तेव्हा हे महान बुजुर्ग पैशांच्या राशीचा धूर दूर उपाशीपोटी उभे राहून पहात असतील, त्यानंतर ही त्यांनी "इंडिया सॅल्यूट" या शीर्षकाखाली फाळके वर लेख लिहिला, त्यात त्यांनी लिहिले की "आपल्या देशात सिनेमा आणून त्यांनी 60 हजार लोकांना रोजगार निर्माण करून दिला, पण आज ते स्वतःच रोजगाराच्या शोधात आहे,
ही वेळ भारतीय सिनेमाचे जनक "फाळके" यांच्यावर आली याची खंत वाटते. असो या रौप्य महोत्सवात फाळकेंचा गौरव करण्यात येणार होता आणि अध्यक्ष होते गव्हर्नर सर रॉजर लम्लें, प्रत्यक्षात फाळके कुठेतरी बसले होते आणि याच भान आयोजकांनाही नव्हते, 
ही वेळ त्यांच्यावर येणं म्हणजे....! 

व्यासपीठावर उपस्थित असलेले लोक दादासाहेबांनी जेव्हा पहिला सिनेमा केला तेव्हा जन्माला देखील आले नव्हते, गव्हर्नर आणि स्वागत समितीचे अध्यक्ष त्यांच्या भाषणातून फाळकेंचा वारंवार उल्लेख करत होती, पण जे प्रेक्षक फाळकेंना बघायला आले होते ,त्यांना त्यांचा परिचय देखील करून देण्यात आला नाही, माणसाचा याहून अधिक कृतघ्नपणा तो कोणता असेल ? 
बाबुराव पटेल व इतर लोकांनी ही गोष्ट संयोजकांच्या लक्षात आणुन दिली, 
मग धावपळ सुरू झाली ... 
पृथ्वी राज कपूर यांनी मोठ्या आदराने दादासाहेबांचा हात धरून त्यांना व्यासपीठावर आणले, पण तिथेही त्यांच स्थान एका कोपऱ्यात होतं.. 
समारंभ सुरू असताना प्रत्येक जण दादासाहेबांच्या कर्तृत्वाचा गुणगान करत होता, कौतुक करत होता .. 

सर्वांचं संपल मग पृथ्वी राज कपूर उठले आणि त्यांनी फाळकेंची ओळख आपल्या बोटांनी करून दिली तेव्हा सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला तेव्हा फाळके खाली मान घालून बसले होते..

दादासाहेबांनी सत्काराला उत्तर म्हणून भाषण लिहून आणले होते 
ते बोलायला उभे राहिले पण त्यांचा कंठ दाटून आला हे गजानन जहागीरदार यांच्या लक्षात येताच, त्यांनी फाळके यांना खुर्ची वर बसवले आणि त्यांचं भाषण स्वतः वाचून दाखवले ते असं ... 
" सत्तर वर्षेपर्यंत देवाने मला जिवंत ठेवले, याचा आनंद मानावा की खेद मला कळतं नाही, आनंदाच्या दृष्टीने पाहिले तर मला खूप आनंद होत आहे, यावेळी महाभारतातील शकुंतलेची व तिला पितृस्थानी असलेल्या कन्व मुनींची आठवण येते, शकुंतला ही कन्व महामुनींच्या एका गरीब तपसव्याच्या आश्रमात वाढलेली, तृणधान्य व कंदमुळे यावर तीच जीवन, आणि हीच गोष्ट माझ्या सिनेमाकन्येची आहे ,
शकुंतला पुढे यौवनात आल्यावर तिला राजवैभवाने नटलेली पाहण्यात जेवढा आनंद कन्व् मुनींना झाला असेल, त्याहूनही जास्त आनंद मला होत आहे, अशा वैभवसंपन्न बाळाला पाहून म्हणजे तिचा आज पंचवीसावा वाढदिवस म्हणजे तिची "सिल्व्हर ज्युबिली" एवढ्या थाटामाटात होत आहे हे पाहून कोणत्या पित्याला धन्यता वाटणार नाही ? 
परंतु प्रकाशाच्या मागे छाया ही आहेच , वैभव किंवा द्रव्य यांची मोहिनी इतकी विलक्षण आहे की त्यांनी पछाडलेल्या लोकांची डोळे "जननी- जनकाला" न ओळखण्याइतके धुंद होतात, 
तसेच माझ्या सिनेमाकन्येच्या बाबतीत झाले आहे..... 

दादासाहेबांच्या या हलाखीच्या स्थितीत चित्रपटसृष्टी ने त्यांना एक पिशवी दिली होती, त्यात 6250 रुपये आणि 6 आणे जमले होते, त्यापैकी प्रभात फिल्म कंपनी ने 1200 , न्यु थिएटर ने 500 व रणजित फिल्म कंपनी ने 500 रुपये दिले होते

25 ऑगस्ट 1939 रोजी दादासाहेबांनी व्ही शांताराम यांना पत्र लिहून दसऱ्याला पोचतील या बेताने 5 रुपये पाठवावावे ही विनंती देखील केली होती आणि त्यांनी पाठवले देखील होते 

1943 च्या अखेरीस "मूव्हिंग पिक्चर" ने दादासाहेबांना पत्र लिहून त्यांची माहिती व छायाचित्रे मागवली होती पण फाळकेंनी लिहिले की... 
" माझं अपत्य मला पूर्णपणे विसरलं आहे,मी त्याला स्मरण देऊ का, की तुझा जनक आहे ? मला आता या क्षेत्रा बद्दल अजिबात रस उरला नाही, त्यामुळे माझ्यासाठी कुणीही काहीही करू नये, मला आता कुठल्याही प्रकारची अपेक्षा, उमीद, व उत्साह राहिला नाही.. " 

16 फेब्रुवारी 1944 साली वयाच्या 74 व्या वर्षी दादासाहेबांची अखेर होती ...!

Writer: Rameshwar Jite 

Comments

Popular posts from this blog

सिनेमा ऑफ आइसलँड

कुठलाही सिनेमा समजुन घेण्यासाठी आपल्याला त्याची पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं असतं, तो कुठे घडतो, तो कुठल्या काळातला आहे, प्रदेश कुठला आहे, थोडक्यात काय तर स्थळ, काळ आणि वेळ या गोष्टी जरी समजून घेतल्या तरी आपणास दिग्दर्शकाचा दृष्टिकोन समजायला मदत होते, आणि मग सिनेमाचे तांत्रिक घटक, शैली हे ही तितकंच महत्त्वाचे आहे, म्हणायचं एवढंच की सिनेमा बघत बघत तो आपण शिकणं ही गरजेचं आहे  "LAMB" 2021  DIRECTOR - Valdimar Jóhannsson आजचा सिनेमा आहे थेट आइसलँड मधून, या देशाचा अभ्यास केला तर लक्षात येते, की कमी लोकसंख्या असलेला हा देश आणि इथे राहणारे लोकं हे मानसिक आजाराने ग्रस्त आहे, आणि दर किलोमीटर अंतरावर जर अभ्यास केला तर लक्षात येईल की फक्त 3 लोकं 4 या अंतरावर राहतात, थोडक्यात एकलकोंडी आणि कायम कामात व्यस्त राहणारी ही मंडळी आहे, आणि अशाच एका परिवाराची गोष्ट दिग्दर्शकाने आपल्यासमोर काल्पनिक (fantasy) स्वरूपात मांडली आहे आणि ती गोष्ट म्हणजे "लॅम्ब" ( मेंढीच पिलू ज्याला आपण कोकरू म्हणतो)  इंगमर आणि मारिया हे दोघे आइसलँड मधील एका प्रदेशात एका डोंगराच्या पायथ्याशी राहत ...

3 BODY PROBLEMS - RJ

WHAT IS - 3  B O D Y  P R O B L E M S ?  The Netflix series " Three-Body Problem " is an upcoming adaptation of the award-winning Chinese science fiction novel trilogy written by Liu Cixin. The series is highly anticipated due to the popularity and critical acclaim of the novels. The concept of "Three-Body Problem" revolves around humanity's first contact with an alien civilization, known as the Trisolarans, who inhabit a planet in a distant star system. The trilogy explores themes of science, philosophy, morality, and the nature of civilizations. It delves into complex scientific concepts such as astrophysics, game theory, and the Fermi paradox, all while telling a gripping story of human perseverance and the search for understanding in the face of the unknown. The central premise of the series is based on the three-body problem in classical mechanics, which is a mathematical challenge concerning the motion of three interacting bodies under the infl...

भारतीय सिनेमा इतिहासात प्रथमच

भारतीय सिनेमा इतिहासात प्रथमच !  जर मला सिनेमाबद्दल प्रेम आणि आकर्षण नसते, आणि माझ्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द नसती तर भारतात 1913 साली चित्रपट निर्मितीची स्थापना झालीच नसती  हे दादासाहेब फाळके म्हणाले होते, आणि त्यात एक सत्य होतं, आणि खरंय जर त्यांनी त्यावेळी सुरुवात केली नसती तर कदाचित आज भारतीय सिनेमाचा इतिहास एका वेगळ्याच स्वरूपात उभा राहिला असता,                                      प्रयत्न करत काही तरी नवीन करू पाहणे हे तितकंच महत्त्वाचे असते, म्हणूनच आज भारतीय सिनेमात होणारा बदल हा त्या लोकांमुळेच आहे जे आपल्या सिनेमांत सतत काहीतरी नवीन घेऊन येतात, आणि अशाच काही नवीन गोष्टी जेव्हा भारतीय सिनेमात पहिल्यांदा येतात किंवा आल्या होत्या तर त्या कोणत्या ? खर तर ज्यांना सिनेमा हा विषय अभ्यासायला आवडतो त्यांना या गोष्टी नक्की आवडेल असं गृहीत धरून मी सुरुवात करतो  7 जुलै 1896 साली भारतात पहिल्यांदा ल्युमियर बंधूनी मुंबईतील वाटसन हॉटेल मध्ये चित्रपट दाखवला...