भारतीय सिनेमा इतिहासात प्रथमच !
जर मला सिनेमाबद्दल प्रेम आणि आकर्षण नसते, आणि माझ्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द नसती तर भारतात 1913 साली चित्रपट निर्मितीची स्थापना झालीच नसती
हे दादासाहेब फाळके म्हणाले होते, आणि त्यात एक सत्य होतं, आणि खरंय जर त्यांनी त्यावेळी सुरुवात केली नसती तर कदाचित आज भारतीय सिनेमाचा इतिहास एका वेगळ्याच स्वरूपात उभा राहिला असता,
प्रयत्न करत काही तरी नवीन करू पाहणे हे तितकंच महत्त्वाचे असते, म्हणूनच आज भारतीय सिनेमात होणारा बदल हा त्या लोकांमुळेच आहे जे आपल्या सिनेमांत सतत काहीतरी नवीन घेऊन येतात, आणि अशाच काही नवीन गोष्टी जेव्हा भारतीय सिनेमात पहिल्यांदा येतात किंवा आल्या होत्या तर त्या कोणत्या ? खर तर ज्यांना सिनेमा हा विषय अभ्यासायला आवडतो त्यांना या गोष्टी नक्की आवडेल असं गृहीत धरून मी सुरुवात करतो
7 जुलै 1896 साली भारतात पहिल्यांदा ल्युमियर बंधूनी मुंबईतील वाटसन हॉटेल मध्ये चित्रपट दाखवला "मॅजिक लॅम्प" या नावाने ते दाखवण्यात आले होते, आणि त्यानंतर दुसऱ्याच वर्षी कलकत्त्याला दाखवण्यात आले होते
भारतात पहिल्यांदा खऱ्या घटनेवर कुठली फिल्म असेल तर ती
1897 साली भाटवडेकर यांनी चित्रित केली होती, त्यांनी मुंबईत हँगिंग गार्डन मध्ये झालेल्या कुस्तीचे चित्रीकरण केले होते
भारतात पहिला सिनेमा हॉल एफ. मदान यांनी 1907 साली कलकत्ता मध्ये उभारला होता ज्याचं नाव "एल्फिसन्स पिच्चर पॅलेस" हे होते
1912 साली भारताची पहिली थिएट्रिकल फिल्म "पुंडलिक" प्रदर्शित झाली, आणि ती फिल्म आर जी तोरणे यांनी बनवली होती
भारतातला पहिला चलचित्र कॅमेरा 1898 साली कलकत्ता मधील हिरालाल सेन यांनी घेतला होता, त्या कॅमेराच्या साहाय्याने ते राजे महाराजे यांची दिनक्रम चित्रित करून सामान्य लोकांना दाखवायचे
3 मे 1913 साली पहिली भारतीय कथेवर आधारित फिल्म दादासाहेब फाळके यांनी बनवली जी "राजा हरिश्चंद्र" होती,आणि तिचं प्रदर्शन मुंबई मधील "कोरोनेशन थिएटर" मध्ये पार पडले, आणि याच सिनेमाचे पहिले समीक्षण 5 मे 1913 ला बॉम्बे क्रानिकल या वृत्तपत्रातून छापून आले होते, आणि हाच भारतीय पहिला सिनेमा होता ज्याचं विदेशात प्रदर्शन 1914 मध्ये लंडन येथे झाले होते
1920 साली बाबुराव पेंटर यांनी आपला सिनेमा "वत्सला हरण" यासाठी भारतात पहिल्यांदा "पोस्टर" ची सुरूवात केली होती
दादासाहेब फाळके यांच्या दुसऱ्या सिनेमात ( मोहिनी भस्मासुर) पहिल्यांदा स्त्रियांनी अभिनय करायचे ठरवले होते, दुर्गाबाई आणि कमलाबाई या दोन माय लेकी होत्या ज्या भारतीय सिनेमा इतिहासात प्रथमच स्रिया होत्या, या आधी पुरुषच स्त्रीयांची पात्र साकारत असत
भारतीय सिनेमात काम करणारी पहिली विदेशी कलाकार महिला "डोरोथि किंगडोंम" होती , दिग्दर्शक सुचेत सिंह यांच्या "शकुंतला" (1920) या सिनेमात तिने अभिनय केला होता
1924 साली प्रदर्शित झालेली "काला नाग" ही पहिली भारतीय "थ्रिलर" फ़िल्म आहे
"विदेशी वस्रों की होली" ( 1921) या सिनेमात पहिल्यांदा महात्मा गांधी दाखवले गेले होते
1926 साली निर्मित पेंढारकर बंधूंची फिल्म "वंदे मातरम आश्रम" ही पहिली फिल्म होती जिच्यावर प्रदर्शनापूर्वीच बंदी घालण्यात आली होती
-Rameshwar jite
Comments
Post a Comment