Skip to main content

Posts

Showing posts from October, 2022

JAHNU BARUA | ASSAMESE DIRECTOR |

"जाहनु बरुआ" बघितला का ? आसाम मधील शिवसागर येथे यांचा जन्म 1952 साली झाला, आणि सिनेमा सागरात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली, एक भारतीय उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक म्हणून यांचा अभिमान कायमचा...                                   जहानू बरुआ यांनी आपली मातृभाषा आसामी आणि तसेच हिंदी चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हलोदिया चोरये बोधन खाई (1987) फिरिंगोती (1992) झगरोलोई बोहू दूर (1995) मैने गांधी को नही मारा (2005) कोणीकर रामधेनू (2003) बंधन (2012) आणि अजेयो (2014 ) हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत "जाहनू बरुआ" यांना पद्मश्री (2003) आणि पद्मभूषण (2015) ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी 1993 मध्ये भारतीय चित्रपट दिग्दर्शक संघाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा जबाबदारी स्वीकारली आहे "जाहनू बरुआ" यांना 12 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 8 आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत हलोदिया चोरये बोधन खाई (1987) हा त्यांचा सिनेमा पाहून त्यांच्या अनेक कलाकृतींच्या सागरात हरवु...

भारतीय सिनेमाचा प्रवास

भारतीय सिनेमा इतिहासात प्रथमच !  सिनेमा नावाच्या दिव्य कलेचा उगम झाला, ल्यूमियर बंधूंनी या दिव्य कलेचा लोकांना साक्षात्कार घडवून आणला, आणि मग लोकांना हसवण, रडवणे, चकित करणे, वास्तवाची जाणीव करून देणे हे सिनेमाच्या माध्यमातून जगभर सुरू झाले, आणि भारतात ही त्याचे पडसाद उमटले, भारतीय सिनेमा हळूहळू एक एक पायरी चढू लागला,आज तो कुठे आहे याची कल्पना आहेच, पण या आधी हा सिनेमा नावाचा कॅनव्हास कसा पूर्ण झाला ते बघू                                  भारताची पहिली महिला निर्माती आणि दिग्दर्शक ही " फातिमा बेगम " होती  ( बुलबुल-ए-परिस्तान) भारतातील पहिला ( सवाक सिनेमा )  बोलपट " आलम आरा " दिग्दर्शक -आर्देशिर इराणी, या सिनेमामधे एकूण 7 गाणी होती, मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमा हॉल मध्ये 1931 साली दाखवला गेला होता  भारतातील पहिला कलर सिनेमा हा 1933 साली आलेला " सैरंध्री " हा होता पण या सिनेमाची प्रिंट व्यवस्थित नसल्या कारणाने " किसान कन्या " या सिनेमाचं नावं रेकॉर्डला दिल्या गेलं  "किसा...

भारतीय सिनेमा इतिहासात प्रथमच

भारतीय सिनेमा इतिहासात प्रथमच !  जर मला सिनेमाबद्दल प्रेम आणि आकर्षण नसते, आणि माझ्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द नसती तर भारतात 1913 साली चित्रपट निर्मितीची स्थापना झालीच नसती  हे दादासाहेब फाळके म्हणाले होते, आणि त्यात एक सत्य होतं, आणि खरंय जर त्यांनी त्यावेळी सुरुवात केली नसती तर कदाचित आज भारतीय सिनेमाचा इतिहास एका वेगळ्याच स्वरूपात उभा राहिला असता,                                      प्रयत्न करत काही तरी नवीन करू पाहणे हे तितकंच महत्त्वाचे असते, म्हणूनच आज भारतीय सिनेमात होणारा बदल हा त्या लोकांमुळेच आहे जे आपल्या सिनेमांत सतत काहीतरी नवीन घेऊन येतात, आणि अशाच काही नवीन गोष्टी जेव्हा भारतीय सिनेमात पहिल्यांदा येतात किंवा आल्या होत्या तर त्या कोणत्या ? खर तर ज्यांना सिनेमा हा विषय अभ्यासायला आवडतो त्यांना या गोष्टी नक्की आवडेल असं गृहीत धरून मी सुरुवात करतो  7 जुलै 1896 साली भारतात पहिल्यांदा ल्युमियर बंधूनी मुंबईतील वाटसन हॉटेल मध्ये चित्रपट दाखवला...