माफ़ करा दादासाहेब....! खूप काही असताना जे "टोचतं" ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, फाळकेंना कसं विसरून जमेल हो ....! त्यांच्या आयुष्यातील हे ही दिवस होते यावर विश्वास बसत नाही ... (image - dadasaheb falke " the father of indian cinema" ) 1939 च्या मे महिन्यात भारतीय चित्रपटसृष्टीचा रौप्य महोत्सव मुंबईत साजरा झाला, या आधीच 'फिल्मइंडिया' चे संपादक बाबुराव पटेल यांनी आपल्या लेखात लिहले होते की रौप्य महोत्सव साजरा करत असताना आपण "फाळके" यांना विसरता कामा नये, त्यांनी आपल्या देशाला मनोरंजनाचे एक नवे माध्यम आणि संस्कृती चे एक नवे साधन बहाल केले आहे, अशा शब्दांत त्यांनी फाळके यांचा गौरव करत व फाळके यांच्या हलाखीच्या परिस्थिती कडे लक्ष वेधत ते म्हणाले की "मोठ्या थाटामाटात रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी हजारो पैसे खर्च करण्यात येईल, तेव्हा हे महान बुजुर्ग पैशांच्या राशीचा धूर दूर उपाशीपोटी उभे राहून पहात असतील, त्यानंतर ही त्यांनी "इंडिया सॅल्यूट" या शीर्षकाखाली फाळके वर लेख लिहिला, त्यात त्यांनी लिहिले की "आपल्या देशात सि...